ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:09 AM2021-08-14T06:09:53+5:302021-08-14T06:10:34+5:30

ओझोन थरांची चाळणी रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न हवेत

Were the return ropes cut off from global warming? | ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

googlenewsNext

- श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची ३० वर्षे तापमान वाढतच जाईल. 

सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.  अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात  अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि  भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.  (समाप्त)

...तर दोन दशांशांचा दिलासा
 २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. आता कडक पावले उचलली तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्सीअस इतकी वाढ होईल. एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल. कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोचता येणार नाही.

पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. हे सुंदर जग वाचविण्यासाठी शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.  
- भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई

Web Title: Were the return ropes cut off from global warming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.