राणी मुखर्जीने अखेरीस सांगितले हे सिक्रेट, या कारणामुळे केले आदित्य चोप्रासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:19 PM2020-04-22T16:19:00+5:302020-04-22T16:20:01+5:30

राणी आदित्यच्या प्रेमात का पडली याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Rani Mukerji said, 'If Aditya Chopra was Social Like Karan Johar, I Wouldn't Have Fallen for Him' PSc | राणी मुखर्जीने अखेरीस सांगितले हे सिक्रेट, या कारणामुळे केले आदित्य चोप्रासोबत लग्न

राणी मुखर्जीने अखेरीस सांगितले हे सिक्रेट, या कारणामुळे केले आदित्य चोप्रासोबत लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देराणीने म्हटले होते की, आदित्यला आपले खाजगी जीवन लोकांसमोर मांडायला आवडत नाही. आदी जर करण जोहरसारखा असता तर नक्कीच मी त्याच्या प्रेमात पडले नसते.

आदित्य चोप्रा बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक असला तरी तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. आदित्य चोप्राने २०१४ मध्ये राणी मुखर्जीसोबत लग्न केले आणि त्यामुळे मीडियात त्याच्या नावाची जास्तच चर्चा होऊ लागली. हे आदित्यचे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न पायल खन्नासोबत झाले होते. पायल ही एका बड्या उद्योगपतीची मुलगी आहे. आदित्यला आपले वैयक्तिक आयुष्य लोकांसोबत शेअर करायला आवडत नाही. त्यामुळे तो कधी मुलाखतींमध्ये देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणे टाळतो.

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या अफेअरची काही वर्षांपूर्वी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. पण त्या दोघांनी यावर मौन राखणेच पसंत केले होते. त्यांनी नेहमीच त्यांचे नाते मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 21 एप्रिलला राणी आणि आदित्यने अगदी साधेपणाने लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना आदिरा ही मुलगी असून तिला देखील ते नेहमीच मीडियापासून दूर ठेवतात. 

राणी आदित्यच्या प्रेमात का पडली याबाबत तिने एका मुलाखतीत काही वर्षांपूर्वी सांगितले होते. राणीने म्हटले होते की, आदित्यला आपले खाजगी जीवन लोकांसमोर मांडायला आवडत नाही. आदी जर करण जोहरसारखा असता तर नक्कीच मी त्याच्या प्रेमात पडले नसते... करण सोशल मीडियावर सक्रिय असतो... तो सगळ्या पार्टींना जातो... तो प्रत्येक दिवशी काही ना काही तरी वेगळे करत असतो. तो सगळीकडेच असतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. माझ्यासाठी माझ्या कुटुंबातील सगळेजण जास्तीत जास्त वेळ घरी असले पाहिजेत आणि त्यांनी बाहेरच्या व्यक्तींना नव्हे तर घरच्या लोकांना प्राधान्य दिले पाहिजे... माझा नवरा सतत काम करत असेल तर मी कंटाळते. आदी त्याचा दिवसातील अर्धा वेळ स्टुडिओत घालवतो. पण त्यातही तो पार्टींना जाणारा असता तर त्याचा संपूर्ण दिवसच घराच्या बाहेर गेला असता. त्यामुळे माझा नवरा पार्टींना जात नाही यामुळे मी प्रचंड खूश आहे. त्याचे काम झाल्यानंतर तो थेट घरी येतो आणि घरातल्यांसोबत वेळ घालवतो. 

 

 

Web Title: Rani Mukerji said, 'If Aditya Chopra was Social Like Karan Johar, I Wouldn't Have Fallen for Him' PSc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.