पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट
By Admin | Published: June 23, 2017 11:20 PM2017-06-23T23:20:48+5:302017-06-23T23:23:45+5:30
सेनगाव : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याही प्रलंबित राहिल्या असून शेतकरी चातकावानी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील ७० टक्के पेरणी जवळपास पूर्ण झाली असून ३० टक्के पेरण्या बाकी आहेत. अशा स्थितीत मागील सहा दिवसांपासून पावसाने तालुक्याला हुलकावणी दिली आहे. पेरणीनंतर किमान एक तरी दमदार पावसाची गरज असताना पावसाने दडी मारलयाने दुबार पेरणी संकट तालुक्यात घोंघावत आहे. दोन दिवसात तालुक्यात चांगला पाऊस झाला नाही तरी बहुतांश लागवडी क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. पावसाने खंड दिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणी कलेले व पेरणी प्रलंबित राहिली असे दोन्ही शेतकरीवर्ग चिंतेत सापडले आहेत.