Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 02:29 PM2021-10-30T14:29:09+5:302021-10-30T14:41:33+5:30

Ashok Gehlot And Modi Government : आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत

i was magician so work has gone government will run for five years says ashok gehlot | Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

Ashok Gehlot : "लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ; मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून हा खेळ चालला"

Next

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी गेल्या वर्षी आपल्या सरकारवर आलेल्या संकटावरून पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "लोकशाही हा जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. मी जादूगार होतो, म्हणून हा खेळ चालला" असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आपलं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच" असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गेहलोत सध्या  बीकानेर, सीकर, चुरू आणि जयपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. 

अशोक गेहलोत यांनी प्रशासनाची शहर/गावांसोबत मोहीम' कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरांना भेट दिली. यावेळी जनतेसमोर काँग्रेस सरकारच्या कामांचा पाढा वाचतानाच आपल्या सरकारला गेल्या वर्षी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. शाहपूराच्या करीरी गावात झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी अशोक गेहलोत आपल्या सरकारला साथ देणाऱ्या अपक्ष आणि बसपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सहा आमदारांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.

"अमित शाह यांचे सर्वच प्रयत्न येथे अयशस्वी ठरले"

आमदारांमुळेच आपलं सरकार वाचलं अन्यथा आपल्याला राजीनामा द्यावा लागला असता, असं म्हणत गेहलोत यांनी आभार मानले आहेत. तसेच "अमित शाह यांचे सगळे प्रयत्न इथे अयशस्वी ठरले" असं म्हणत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. "आमचं सरकार वाचलंय ते या लोकांमुळेच... भाजपाने दिल्लीच्या दरबारात बसून याचा कट रचला हे आम्ही कसं विसरू शकतो. काय काय डावपेच खेळण्यात आले नाहीत... हे सगळे आमदार तब्बल 34 दिवस माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिले. 100 पैकी 19 निघून गेले... पण हा लोकशाही हा जादुई आकड्यांचा खेळ आहे. मी स्वत:च जादूरगार होतो म्हणून खेळ चालला."

"200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"

"जादुई आकड्याच्या खेळात 200 आमदारांपैकी 101, 100 असा आकड्यानं खेळ चालत नाही"  असं देशील अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली 18 आमदारांनी गहलोत यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे गेहलोत सरकारवर संकट कोसळलं होतं. मात्र पक्ष नेतृत्वानं वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: i was magician so work has gone government will run for five years says ashok gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.