Next

शिवसेनेतील आमदारांनी व्यक्त केली नाराजी, कारण काय? Nagar Panchayat Election 2022 | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 03:57 PM2022-01-21T15:57:13+5:302022-01-21T15:57:37+5:30

गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असणाऱ्या शिवसेनेतील नेत्यांना नाराजी व्यक्त करायला अनेक कारणं मिळताय. कधी पक्षातंर्गत राजकारण तर कधी महाविकास आघाडीशी धुसफूस.. आता राज्यातील नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यावरुन पक्षातील आमदारांनी पक्षावरच नाराजी व्यक्त केली. सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. भाजपानेही सर्वाधिक जागा जिंकून नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारली. एकत्रित विचार केला तर महाविकास आघाडी ही भाजपवर भारी पडली आहे. असं असलं तरी मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातले लढले होते. आणि या लढतीमुळे या तिन्ही पक्षात जोरदार तूतू मैमै पहायला मिळाली.