जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:37 PM2022-01-11T17:37:04+5:302022-01-11T18:21:02+5:30

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले.

untimely rain damages crops on 3054 hectares in wardha district | जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

जिल्ह्यात अवकाळीने ३,०५४ हेक्टर पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवालजिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर

वर्धा : जिल्ह्यात ८ आणि ९ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे ३,०५४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून, ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात १ जानेवारीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच ८ आणि ९ जानेवारी रोजी दोन दिवस तुफानी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. प्रामुख्याने आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, १,७६५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच आर्वी तालुक्यात ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, कारंजा तालुक्यात ७२७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. गव्हाचे २८९ हेक्टरवर नुकसान झाले असून, हरभरा १,१९६ हेक्टर, कापूस ८४ हेक्टर, तूर ७५९ हेक्टर, ऊस ३ हेक्टर, फळपिके ६६६ हेक्टर, भाजीपाला १ हेक्टर तसेच इतर पिकांचे ५६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. पिके पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने मांडले ठाण

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. सततच्या पावसामुळे गहू, हरभरा सोंगणीचे काम लांबणीवर पडले आहे. सोंगणी केलेले पीक शेतात ओले झाले आहे. तर अशा वातावरणामुळे फळांच्या दरांवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

३३ टक्क्यांवर झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका   -   नुकसान क्षेत्र

आर्वी      -     ५६२

आष्टी      -       १,७६५

कारंजा   -         ७२७

पिकांचे झालेले नुकसान (हे.मध्ये)

तालुका गावे शेतकरी गहू हरभरा कापूस तूर फळपिके

आर्वी - ११ ८९८ २४ २६४ ८४ १७८ १२

आष्टी - २२ १९३९ १११ ८३० ०० ५८१ १८७

कारंजा - १९ ९४६ १५४ १०२ ०० ०० ४६७

५२ गावांतील ३,७८३ कुुटुंबं बाधित

८ व ९ जानेवारी रोजी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांना मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच तिन्ही तालुक्यातील ५२ गावांतील तब्बल ३ हजार ७८३ कुटुंबं बाधित झाली असून, त्यांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

Web Title: untimely rain damages crops on 3054 hectares in wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.