बोगस विहिरींची एसीबीकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:51 AM2017-11-17T00:51:17+5:302017-11-17T00:51:21+5:30
घनसावंगी तालुक्यात २०११-२०१३ दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत मंजूर ९२ विहिरी बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याप्रकरणाची गोपनीय चौकशी पूर्ण झाली असून एसीबीने आता खुल्या चौकशीला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात २०११-२०१३ दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत मंजूर ९२ विहिरी बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. याप्रकरणाची गोपनीय चौकशी पूर्ण झाली असून एसीबीने आता खुल्या चौकशीला सुरुवात केली आहे. गुरुवारी लाचलुचपतच्या वरिष्ठ अधिका-यांनी महसूल अधिका-यांना सोबत घेऊन कुंभार पिंपळगाव येथील आठ शेतकºयांच्या शेतात जाऊन चौकशी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस नाईक संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, ज्ञानेश्वर मस्के, ग्रामविकास अधिकारी श्रीरंग थोटे, भूमी अभिलेख छाननी लिपिक उकळकर, दुरुस्ती लिपिक चाळक, मंडळ अधिकारी आप्पासाहेब खोटूळे, तलाठी जोगदंड, कंधारे यांचा या पथकात समावेश होता. पथकातील अधिकाºयांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन विहिरींचा कामांंची पाहणी केली. तसेच महसूल अधिकाºयांकडील जुने रेकॉर्ड तपासून विहिरींची छायाचित्रेही काढली. २०११-१३ दरम्यान, घनसावंगी तालुक्यात मग्रारो मध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी वर्षा पवार यांच्या कार्यकाळात तालुक्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या विहिरी असंख्य विहिरी या बोगस झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्या आधारे तालुक्यातील १८ गावांत ही चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत विभगाचे उपअधीक्षक निकाळजे यांनी सांगितले. मात्र, त्यांनी याविषयी सविस्तर माहिती देण्याचे टाळले. तालुक्यातील अठरा गावांमध्ये ही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी एसीबीच्या अधिका-यांनी अशाच प्रकारे चौकशी केली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही. आता नवीन अधिकारी आल्यामुळे पुन्हा ही चौकशी करण्यात येत आहे. दीड महिन्यापूर्वी तालुक्यातील ग्रामसेवकांना जालना येथे बोलावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोपनीय चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.