बॉलिवूड सुपरस्टार्सच्या लग्नातील फोटोचा दुर्मिळ अल्बम, बघा यातील किती जणांना ओळखू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 06:24 PM2020-03-11T18:24:40+5:302020-03-11T19:06:12+5:30

अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न २० एप्रिल २००७ रोजी झाले. यांच्या लग्नाला १३ वर्ष झाली असून त्यांना आता ८ वर्षाची मुलगी आहे.

अमिरचा 'कयामत से कयामत' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने रीना दत्ताशी लग्न केले होते काही वर्ष एकत्र राहिल्यानंतरते वेगळे झाले आणि अमिरने किरण रावशी लग्न केले.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नात बऱ्याच अडचणी आल्या. धर्मेंद्र आणि हेमा यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.

दिलीप कुमार यांनी १९८१ साली सायरा बानूशी लग्न केले. दिलीप कुमार यांचे हे दुसरे लग्न होते.

हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे १९७३ साली विवाहबंधनात अडकले.

३१ ऑक्टोबर १९७४ साली जितेंद्र आणि शोभा कपूर हे विवाह बंधनात अ़डकले. शोभा कपूर आणि जितेंद्र हे लहानपनापासून चांगले मित्र होते.

करिष्मा कपूरने २००३ साली उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केले. ११ वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते दोघं वेगळे झाले.

बॉलिवूडमधल्या चर्चेतल्या जोड्यांपैकी एक जोडी शाहीद कपूर आणि मीरा राजपूत. या दोघांनीही घरच्यांच्या पसंतीने ७ जुलै २०१५ साली लग्न केले.

२२ जानेवरी १९८० साली ऋषी कपूर आणि नितू सिंग हे लग्नबंधनात अडकले. यांची जोडी जेवढी चित्रपटात हिट आहे तितकीच खऱ्या आयुष्यात देखील आहे. .

रणधीर कपूर आणि बबिता यांचे ६ नोव्हेंबर १९७१ साली लग्न झाले.

संजय दत्तने १९८७ मध्ये अभिनेत्री रीचा शर्मा हिच्याशी लग्न केले होते नंतर ते वेगळे झाले आणि संजयने मान्यता सोबत लग्न केले.

बॉलिवूड बादशाह शाहरुख खान याने २५ ऑक्टोबर १९९१ साली गौरी खानसोबत लग्न केले. शाहरूख आणि गौरीचा धर्म वेगळा असूनही गौरीच्या आई- वडिलांनी दोघांचे लग्न लावून दिले.

हिंदी चित्रपटातील सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न मार्च १९७३ साली झाले