Next

दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:44 PM2019-09-14T12:44:03+5:302019-09-14T12:44:38+5:30

नवी दिल्ली - प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला ...

नवी दिल्ली - प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी म्हणाले, "याची गरज असल्याचे मला वाटत नाही. आम्ही जो रिंग रोड तयार केला आहे, त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. पुढील दोन वर्षांत आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल."